Sunday 2 September 2012

हरिश्चंद्रगड ...माळशेज घाट आले फाटा मार्गे --खिरेश्वर तलाव

..............हरीश्चंद्र गड ......प्रवास
हि ट्रीप अगोदर ठरवली होती .माझ्या मनात एक विचार आला कि राज बरोबर नाईट वॉककरायचा आणी तो पौर्निमेच्या  रात्री ...जंगलातून ......पुण्यात असा स्पॉट दिसेना ...आणी मी कधीतरी कोकण कड्याचे फोटो पहिले होते .म्हणून हरीस्चान्द्रा गड ठरवला ,,,पण लोक म्हणाले तो अवघड आहे ..सध्या राजगड ला जाऊ .राजगड  करून आलो ...आणी मधेच ठरल कि ठीक आहे जाऊ ..त्या ची फरफट नको म्हणजे त्याला ज्यासाठी न्यायचा ते कारण बाजूला राहत ..आणी बाकी अडचणी जीव खातात म्हणून मी अगोदर जाऊन ययाच ठरवल ....प्रशांत ला बोललो तो एका पायावर तयार झाला .....सोम्या ...नाही हेम्या शश्या बाटलीचे हकदार ..चालायचं शक्यच नव्हत ..त्यांना खऱ्या परी राज्यात नेल तरी दरवाजा उघडणार नाहीत ...कशाला उगाच ..चालायचा त्रास ...(उचलून नेतोस का ?मग येतो...)मग हर्डीकर ला विचारल मालकांची इच्छा झाली तर त्यादिवशी ठरवू ...अमेय ला  विचारल तर ,त्या दिवशी त्याच्या मिटींग होती ...नंतर हार्डी तयार झाला ...अमेय पण हो म्हणाला रात्री काळाल  कि तो खरच २ दिवसांचा ट्रेक आहे ...अवघड असावा...पुण्यापासून १७० किमी लांब ..खिरेश्वर गावाजवळ अगोदर जंगलातून चालायचं त्या नंतर कडा चढायचा ..त्यानंतर पुन्हा चालायचं ७ किमी मग तिथल शंकराच देवूळ ..त्यापुढे कोकण कडा .गुगल अर्थ म्हणजे चित्र गुप्त सगळ्याच हिशोब ठेवतो .त्याची चोपडी बघितली ...इथ स्पेन सारख नाही कि कुठल्याही रस्त्यवर उतारा आणी पहा ....भारतातील  शहरे जाउद्यात पण अशा ठिकाणांसाठी तरी गुगल कॅमेरा ला परवानगी द्यावी ....मी पाहिलं  पुण्याहून  आळे फाटा ....तिथून माळशेज घाट ..धरण संपल्यानंतर नंतर धरणाच्या वाटेवरून गावात ,तिथून त्तोलर खिंड तिथून कडा तो चढल्यावर सपाट डोंगर वाटेत जराशी झाडी ......गुगलवर दाट  झाडी आणी विरळ झाडी अस काही दिसत नाही १०० मीटर उतार कळत नाही ....तो तोलार खिंडी नंतरचा रस्ता (झेड स्पॉट) एक बारीक पायवाट असेल असा मी समज करून घेतला ...जे कोणी नेट वर फोटो टाकले होते त्यात फार काही कळत नव्हते ...त्यामुळे ते फारच अवघड असेल अस वाटल नव्हत ....मध्ये कड्याच्या बाजूची वाट दिसत नव्हती   ...पुसली असेल ..असा सोयीस्कर गैरसमज करून घेतला ...................................................
रात्री अमेय ला सांगितलं कि लवकर निघायला हव १० वाजता ....हर्डीकर ने ट्रेकिंग च  सामान  विकत घेतलं ...नशीब शेर्पा विकत मिळत असता तर तो पण घेतला असता ..अमेयच पण असा प्रयत्न होता पण मी सांगितलं कि फक्त गरजेच समान ..कपडे नाही ..१ टोवेल ..खायला बिस्किटे ..झोपायला चादरी ...कॅमेरे ..बटरी .एकदम हलक ...हार्डी म्हणाला  अरे आपण जेवायचं पण घेवू म्हणजे दुपारच जेवण वाचेल ....ओके   घ्या ....तरीपण सुक्का मसाला सगल्यांनी  घेतला .....पाणी प्यायच्या   प्रत्येकी चार बाटली म्हणजे ४ किलो ..अत्यावशक होत .....................बुट ..बऱ्यापैकी ....गड अवघड म्हणजे किती असेल ?सिंहगड पेक्षा दुप्पट ....जमेल .........
..हार्डी म्हणतो चालन हे माझ काम  नाही मी १०२ किलो च माणूस ..मी त्याला म्हणल तुला चालायची इच्छा आहे कां ?हे अगोदर ठरव त्यानंतर तू ते करू शकतोस कि नाही हे बघुयात .....त्यान अगोदर सिंहगड चढला होता .....त्याच सगळ प्लानिग असत ...काही त्रास नको ....त्यान विचारल आपण राहणार आहे का? मी: -अजून ठरवल नाही ..आपण गडावर जाणार आहोत कि नाही हे पण निश्चीत नाही ......शनिवारी रहायचं ..रविवारी सकाळी पहाटे निघायचा संध्याकाळी परतायचं....जोपर्यंत नीट चालता येतंय तो पर्यंत तो पर्यंत चालायचं ......जीथ नको वाटेल तिथ थांबायचं ....पुढ निघाव वाटल तर निघायचं ४ मिनिट चालायचं आणी १५ मिनिट विश्रांती घ्यायची ....आपल चालन हेच उदिस्त्  आहे .गडावर पोचण हे नाही ..रमत गंमत सहज पणान ......................................................अमेय म्हणाला काय घ्याच ,काही नको फक्त पांघरूण आणी पाणी बिस्कीट .....पण मला जमणार का? मी—तुला या प्रोसेस मधून जायच्य का ? हे अगोदर ठरव ..मग पुढच बोलू ..मी व प्रशांत राजगड  चढलो होतो ..त्याचा स्टमिना मला माहित होता ....माझ्या मनातला जो कडा होता तो मी प्रशांत ला आणी हार्डी ला चढवू शकत होतो ....दादा ला सांगितलं ..(.माझा मुलगा—स्पार्टाकस )---आपण शनिवारी निघायचं आहे तू तुझी बाग भर  ...टे बजन तुला ८ किमी न्यायचा आहे ...जास्ती सामना बद्दल ---टे घ्यायचं  अस ठरल ---  टे गाडीत ठेवायचं आणी शेवटी वाटल तर घ्यायचं .....१० वाजता निघायचं ठरल ...मला काळाल कि जास्ती जास्त लवकर निघायला हव ..हार्डी ९ वाजता येणारा माणूस १० वाजले तरी आला नाही ...१० :४५ ला आला कारण त्याला स्लीपिंग बाग घ्यायची होती ......फक्त प्रवास च करायचा होता म्हणून चीड चीड होत नव्हती ...पण पठ्या खर कुठ सांगतोय .....ओक झाली सुरवात ...........हि सिटी हे एक कॅव्हर असत बाहेर ट्रीप ला निघाला कि टे टाकून दिल जात .....सो यु कॅन सी रिअल पीपल ....तो आला आम्ही निघालो ........अमेय ने जी  पी एस .  आणला होता ...आम्ही जे फोटो घेणार त्यावर त्याच गी पी एस लोकेशन येणार होत .हे माझ्यासाठी ...मला कळाल होत कि तो गड कसा  आहे हे आम्हाला अजून काळाल नव्हत .आणी ज्याला खूप डीटेल माहिती हवी त्याला टी मिळावी म्हणून मी फोटो काढणार होतो ....चाकण गेल मंचर गेल आले फाटा वर २ रस्ते एक जी पी एस दाखवत होता शोर्ट  आणी दुसरा लोकल लोक सांगत होते ....पुढ माळशेज घाट रस्त्याने निघालो ....वाटेत सुळक्याचा  डोंगर दिसला ..तिथून उजव्या  बाजूने खिरेश्वर ला जायला चांगला रस्ता आहे .पण मी विरोध केला जे सोप आहे टे निवडाव ताण  येत नाही .मग आम्ही तलावाच्या बंधाऱ्यावरून जायला निघालो ...हार्डी ने थांबवल ..का तर म्हणे कि त्याला टे योग्य वाटत नाही .....त्यावरून जीप जातात हे मला माहित होत  शेवटी गाडी घातली .....ऐश्वर्या हॉटेल ...तिथ पुण्याच एक ग्रुप होता ..तो निघाला होता आणी आम्ही पोचलो .२:४५ ..मी घाई केली कारण काही लोक जंगलात चुकल्याच मला माहित होत ..चुकायला माझी हरकत नव्हती पण हे लोक हे  चुकण एन्जॉय करू शकणारे नव्हते एका ठराविक प टर्न च्या बाहेर हे रिस्क घेवू शकत नाहीत हे मला माहित होत (हि चांगली गोष्ट असते कारण मग आपण त्यांना त्यांच्या कुवतीच्या बाहेर तानु शकत नाही)
निघालो ..मी सगळ्यात मागे ...चला निघालो इथ रस्ता संपला पण निश्चीत कुठून आत जायचं हे काळात नव्हत ...हार्डी ला त्या माणसान उजव्या बाजूचा रस्ता पकड अस सांगितलं होत .मला हेच टाळायच होत ..म्हणून त्य लोकांबरोबर ...जवळपास रहायचं होत ......मध्येच २ वाटा फुटल्या कि हे लोक मला मागे वळून विचारायचे कि कुठल्या वाटेन जायचं ....आणी मी डावी किवा उजवी जी मला त्या वेली वाटते टी सांगायचो ...पण मला आशचर्य वाटल कि ..वाट कुणालाच माहित नाही हे सगळ्यांना माहित होत ...तरी पण हे अस कस विचारू शकतात .......पण कदाचित मीच टी वाट जाणू शकतो हे टे जानत असावेत ...गुड ओके ...त्यांनी त्यांचा इगो बाजूला ठेवून चालायला सुरवात केलीय हे सिद्ध झाल ..छान ...चढता चढता  रस्ता वर जायच्या ऐवजी खाली जायला लागला ...पुन्हा थांबलो कुठ जायचं ?(झालाना गोंधळ  आता ,,,बघ )मी साक्षात्कारी बाबासारखा खालच्या दिशेन हात केला ....वाट बरोबर होती ...
खरतर वाटेलाच विचारायचं असत कि तू कुठ जातेस ...माझ्या गावाला जातेस तर मी तुझ बोट धरतो लहान मुला सारख मला ने मला सगळय खाना खुणा दाखव .माझी आई हो ...मला तुझ्यावर विश्वास आहे ....इथ आंधळा विश्वास नसतो .मळलेली पायवाट आपणाला दिसताच असते  पण जेंव्हा अशा २ वाटा दिसतात तेंव्हा प्रशन पडतो ....
..पुढ लोकांना हाक मारली .....त्यांनी पण ओ दिली वाटेत बसले होते ...पुढ तोलार खिंड आली  प्रथम लीम्बुसार्बत पिल ...सूर्य मावळायची शक्यता होती म्हणून पुढ निघालो ...

पहिले १० मीटर ..प्रशांत जागेवर बसला ...मी त्याला सांगितलं कि तू तुझी बाग ठेव आणी पुढ निग ...मागून आलेल्या लोकांनी त्याला सपोर्त केला ..तो आणी दादा पुढ गेले .दादा घाबरला नाही ..जस काही तो त्याच गावात जन्माला आला होता ......हि अनुवान्शिकातता हा चर्चेचा आहे .हार्डी बाग घेवून चढला ..पण मला कळेना कि हे त्याला झेपतंय कि नाही ....मग मी विचारल तू ठीक आहेस ना ?...तो हो म्हणाला ..पुढे त्यान बाग काढून ठेवली ...आता त्याला स्वतःला वर चढवण हा त्य्च्यासाठी प्रोजेक्ट होता ....तो हुशार आहे पण अनेकदा त्याची हुशारी त्याला कायम सेफ झोन मध्ये ढकलते .आणी मग तो स्वतः:ची पाठ थोपटतो कि मी कस शहाण्यासारखा निर्णय  घेतला ....इथ मी पाहिलं कि त्यान स्वतःच डोक चालवण बंद केलाय आणी आता काय करायला हव टे तो करतोय .तो माझ्या बरोबर आहे त्याला माझ्या बरोबर असण्यात स्वस्थता आहे ....तो चढायला लागला ..थोड्या वेळान दादा आला .तुम्हाला इतका वेळ क लागतोय .मी त्याला रग ची गुंडाळी दिली व वर पाठव ल ..तो परत आला मग त्याला एक बाग दिली परत वर पाठवला ...तो परत आला ...इकडे अमेय ला वरती पाठवला आणी त्यची बाग ठेवून तो परत खाली गेला कारण हार्डी ची बाग आम्ही खाली ठेवली होती ..टी गेवून परत आला ...नंतर मला म्हणे तुमची बाग मला द्या ..मला कळेना त्याला डबल ओझ का  हव ?त्यावेळी मला काळाल कि प्रशांतची बाग पण माझ्याच खांद्यावर होती .........शेवटी तो झेड स्पॉट संपवला .....थोडस बसलो सूर्य मावळला  होता ...आमच्या जवळ २ ऑपशन होते रात्र तिथच काढायची ......किवा पुढ चालायचं पुढ २ वाटा होत्या ...बाकी सगळे पुढ निघून गेले होते आम्ही ५ जन फक्त तिथे होतो ....बराच पाणी संपल होत पुढ खूप चालायच् य ....आणी बाले किल्ल्याच्या बाजूने एक अवघड रस्ता जातो ...दुसरा सोप्पा लांबून पोचतो हे माहित होत आणी एव्हडाच माहित होत ....त्या फाट्या वर पोचलो ...एक बोर्ड असेल अस वाटत होत ...नव्हता ..अमावस्येची ..शनी अमाव्सेची रात्र होती ...काळा  कुट्ट अंधार ..आकाशात चांदण्या ..भरपेट पुण्यात कधीच दिसत नाहीत ( दादा ची कॉमेंट.. )अशा
असो ...सोप्पा मार्ग नाकारला का ? खरच का टे माहित नाही ....डाव्या बाजूचा जंगलातला मार्ग  निवडला  जरा पुढ गेलो ,,,अमेय पुढ झाला   मला मजा वाटली ...कारण कुणाला निश्चीत कोणचा मार्ग आहे हे माहित नव्हत . तो चुकला कारण जंगलात निश्चीत कुठून घुसायच हेच दिसत नव्हत माहिती नव्हत ..पुढ काय वाढून ठेवलाय टे पण माहित नव्हत ....मी अंदाज घेतला ...घाबरण मनात आल नाही आणी अमेय चुकला म्हणून भीती पण वाटली नाही ..आणी मुख्य म्हणजे किती धोका आहे असा हरडीकरणे गळा काढला नाही ....  कारण मग मार्ग शोधण्यापेक्षा त्याला समजावण ..त्याच्याशी लढन  यात अवेरनेस लागला असता ...चला सुरुवात चांगली झाली दादा सुद्धा घाबरला नाही ...मी पुढ झालो मी आवाहन केल जंगलाला... त्या वाटेला मी तिला शोधणार नव्हतो तीनच आम्हाला पुढ न्यायचं होत नीटपणे  शांततेत सहज पणान आम्ही जर या जगालाच भाग होवून गेलो तर हि वाट हि आमचाच पार्ट होईल आणी मग प्रवास हा आमच्या समोर प्रशन उभा राहणार नाही .अचानक गवतात जागा दिसली टी वाट सरळ जंगलात जात होती ..तीच होती का  दुसरी आणखीन खात्री करावी का असा विचार माझ्या मनात आला नाही .सरळ आत घुसलो पुन्हा अमेय ने लीड घेतलं ....चढतोय आणी चढतोय   प्रशांत .....अरे आपण बालेकिल्ल्यावर जाणार काय ?  मी----नाही आपल्या डाव्या बाजूला बांल्ले किल्ला आहे ...जंगलाल धक्का न लावता जाग न करता चाललो होतो ..टे त्याच त्याच्या व्यवहारात मग्न होत ...आम्ही चा ल न्यात मी घड्याळ काढून टाकले होते ..त्यामुळ किती वाजले  हा प्रशन नव्हता .पूर्ण अंधार जंगलात रस्ता होता मोकळ्या जागेत खडकाळ दगडावर   अमावस्येच्या रात्रीच्या ताऱ्यांच्या प्रकाशात त्या दिसताच नव्हत्या ........मी दादा ला सांगितलं ..दादा .आपली पायवाट तिच्या स्थायी भावान बाजूच्या दगडांपेक्षा वेगळी दिसायला हवी ...तिच्यावरचे बारीक दगड बघ ,,,संकेत शोध .......तो म्हणाला पपा हि बघा अर्धवट खाल्लेली काकडी ...गुड ..असाच शोध ...पापा ह्या गुठ्क्याच्या पुड्या छान ....पपा ...हे मिनट च्या गोळ्याची कॅव्हार्स .....ओके आपण योग्य मार्गान चाललोय .....मला जंगल खराब करण् मान्य नाही पण आम्हाला मिळालेल्या संकेतांनी मजा आली त्यानंतर आम्ही फक्त गुठ्क्याच्या पुद्यांचे पाकीट आणी गोळ्यांची कॅव्हर ...बिस्कीट पुड्यांची रिकामी कॅव्हर शोधात राहिलो ..मधेच अमेय थांबला ..त्याला कन्फुजन ...दादा तो पर्यंत तयार झाला होता त्याला समोर गवतात वाट दिसली .मी तातडीन विथआउट  डीले सांगितल त्या वाटेन जायचं .छान  म्हणजे  न बोलता सगळे सुरु झाले ..पुढ गेल्यावर अमेय खाली सरकला ...मी त्यला म्हणालो काय झाल ?नाही मला हि वाट वाटली .....अस तो म्हणाला ..मी ....नाही अमेय तुला तस क वाटल हा प्रश्न आहे ...काय संकेतांनी तुला तीकड जायला  उदुक्त केल .याचा विचार कर
पुन्हा जंगल यावेळी चढ नव्हता ..फक्त उतार ...हर्डीकर माग होता .  मागून चालला होता बऱ्याच वेळा आम्हाला त्याच्य्साठी एकदम हळू हळू  चालायला लागत होत .खूप दमलो होतो ...खिरेश्वर च जंगल ...तो कडा ..आणी पुन्हा हे जंगल हि अमावस्येची रात्र .....माहिती नसलेला रोड ....बरोबर लोकल लोक नाहीत ...जंगलात कुणी काही प्राणी आहेत कि नाही हे माहित नाही किती भयानक   आहे हे पण माहित नाही ..इथ कुनाला काही चावल तर काय करायचं याचा उपचार पण नाही आणी त्याला उचलून न्यायच्या परीस्तीतीत पण कुणी नाही ...पण सांगतो हा आताच विचार आहे त्या वेळी अस काहीच मनात नव्हत मधेच अमेय ला इंगळी दिसली   तेव्हडीच  ....

पुन्हा जंगल फक्त उतार आम्हा सगळ्यांकडे बातरया होत्या ..फक्त चालतोय ..हर्दीकारची सूचना तू तुझी एक बटरी बंद कर ..मी करून पहिली ...मला जरा अंधार वाटला मी पुन्हा सुरु केली त्यान पण मुद्दा पुढ रेटला नाही ...तो मागून हळूच म्हणतो अरे आपण गड पुन्हा उतरायला तर सुरवात केली नाही ना ?मी सांगितलं या किल्ल्याला सगळीकडे कडे आहेत जो पर्यंत कडा लागत नाही तो पर्यंत आपण उतरत नाही ...मध्येच मला पण वाटून गेल कि आपण दुसऱ्या गावाला पोचणार कि काय ....रस्ताच संपत नव्हता ..........मधेच थांबलो ब्लाइंड फेथ यापेक्षा दुसर काय म्हणायचं .....एका दगडावर बसलो .मधेच बातार्या विझवून कुठ उजेड दिसतोय क टे पाहिलं ..मगाशी ३ किमी वर तस वाटत होत आता तो पण दिसत नव्हता .मला अचानक जड वाटायला लागल ...मी थांबलो कि संपल ..मी हार्डी ला म्हणालो कि आपण जरा पुढ जावून बसू ..तो म्हणाला मला अजून जरा जास्त बटरी चार्ज करायची आहे .मला जरा जास्त दडपण आल मी त्याला उठावल आपण पुढ बसू आता उठ ...आम्ही उठून चालायला लागलो .  अचानक पाठीमाग मोठा आवाज झाला जंगलातून आला हर्डीकर चपळाईन माझ्यापुढे आला ...ओके मी मग राहिलो आता तो आवाज माझ्या माग  येत होता थोड्या अंतरानंतर तो बंद झाला ..मधेच मी मग वळून पहायचा पण प्रयत्न केला कि काय आहे ...खरच  सांगतो  काहीच भीती वाटली नाही ...मला भीती वाटते ...पण त्यावेळी वाटली नाही ...मला जंगलाची पण भीती वाटली नाही ... गप्पकन  एकदम समोर पठार आल आणी छोटे छोटे बाण दिसायला लागले  ..त्यानंतर आम्ही गुठ्क्याची पाकीट सोडली  आणी मिन्त्चे कॅवहार पण सोडले फक्त बाण पाहायला लागलो .वाटेत एक झोपडी लागली ...हुश्श
पण काही उपयोग नव्हता तिथ कोणाच नव्हत ..तिथ एक वाट येवून मिळाली होती ..टी सुरवातीची सात टेकडायवाली लांब पायवाट होती तिथून पुढ निघालो .थोड समाधान कि कशाच्या तरी जवळ आलो ... पुढ एका  ठिकाणी  गाई गुर होती पुढ एक हॉटेल होत माणस नव्हती .....आणी अचानक देवळाचे लाईट दिसले ....जी पहिली झोपडी दिसली तिथ दादा ने वाचाल कि इथे जेवायला मिळेल ..त्याला विचारल तर तो म्हणाला जे असेल टे मिळेल चालेल क? आम्ही हो म्हणालो शेजारी दगडावर पथाऱ्या टाकल्या .....मी सगळ्यांना सक्तीने पाठीवर झोपवल ....रीलाक्स  व्हा ...त्या नंतर १ तासाने जेवण आल भाकरी आणी बटाटा व वांग  न कुटलेल्या शेंगादाण्याबरोबर ....मी ३ भाकरी चुरून खाल्ल्या ....काहींना बायकोची आठवण आली ....कारण मीठ मागून घायायला लागल ..त्यांनीच तिथ झोपायची व्यवस्थ केली झोपलो रात्री मला जग आली झोपडी भोवती काहीतरी फिरत होत .पहाटे  उठून लगेच कोकण कडा पाहायला निघालो कारण सूर्योदयाबरोबर बदलणाऱ्या छटा.तो खोलपणा डोळ्यात भरला .छाती दडपून घेतली .
तिथच आम्हाला भास्कर म्हणून एक परमानंट  मेंबर भेटला तो ४०० रुपयात टेंट देतो जेवण देतो झोपायला चादर देतो गडावर आणतो आणी गडावरून सुखरूप उतरवून देतो ...मानसी ४०० रुपये ......(हर्डीकर दामल्यामुळे आला नव्हता) .....मी त्याचा फोन घेतला .तो नंतर लागत नव्हता ....पुन्हा देवळात गेलो  दादा ला तिथला काळा चहा आवडला नाही त्याला दुधाचा चहा हवा होता ....मला हसायला आल .....प्रशांतला पण चालायचा प्रॉब्लेम होता म्हणून त्याला लवकर पाठवला ...देवळात जरा बसलो तिथ लेणी आहेत पण टी कधी खाली मिळत नाहीत ...कोणीतरी मुक्कामाला असताच ...उघड्यावर झोपताना भीती वाटते ......किवा देवळात सोय होते ....काही लोक आमच्या नंतर रात्री आले अस काळाल ...आमच्याच मार्गान ...  निघताना हर्दीकर्ण निर्णय घेतला कि मी पाचनी मार्गाने येणार  त्याला उतरायची भीती वाटायला लागली आणी त्याला तो आलो त्या मार्गान उतरू शकणार नाही याची खातरी पटली ...नंतर तो त्या ब्भास्कर बरोबर पाच्नी मार्गाने पुण्याला परत आला ...मी त्याला माझा एक जादाचा मोबाईल दिला त्याकडे  पैसे होते . त्यवेळी मला प्रशन पडला कि काय कराव यांच्याबरोबर याव  कि त्याच्या बरोबर थांबव ...मी यांच्या बरोबर आलो कारण त्याच्या बरोबर एक्स्पर्ट येवू शकत होते ...प्रशांत ने एका मुलाला सामान न्यायचे पैसे दिले ..त्यान प्रशांत ला गड उतरवून दिला ...सामानासकट ...सुखरूप पणान ...तो पुढ निघाला   आमच गी पी एस बंद पडल  मग नुस्तेव फोटो काढले .....मग राहिलो   अमेय ला नास्ता करायचा होता पण मी म्हणलो चला ..कारण आम्ही रात्री आलो होतो ..आता परत त्याच मार्गानं जंगलात घुसायच होत ...आणी वेळ जाऊन चालणार नव्हत ....मग धावत पळत जावून त्यांना गाठल .
येताना जीथ जीथ २ वाटा हित्या तिथ तिथ दगडाचे बाण केले ....एक लाकुड  सापडल टे वाटेच्या तोंडावर जमिनीत खोचल .......जेणेकरून जो शोधेल त्याला त्या खुणा सापडतील ..मग अस ठरवल कि परत येवून इथ दगडावर बाण रंगवायचे .......हर्दीकारणे त्याची पूर्ण जबाबदारी घेतली आहे .......कामही सुरु केले आहे ....उतरतान भीती वाटत नव्हती ताण होता न चुकण्याचा  प्रयत्न होता ...दादा म्हणाला पापा निघायचं   ..म्हणल चल लेस बाध .....हळू हळू उतरलो  काही लोक धावत पळत उतरत होते ...काही लोक पावसात कसे चडत असतील के काही मला समजत नव्हत.....खुपच डेंजर ...पुन्हा खिरेश्वर जंगलातून .....उन्हात दुपारी ३ वाजता पोचलो तोच जाताना भेटलेला ग्रुप पुन्हा येताना बरोबर होता ..पुन्हा जंगला बाहेर आलो तेव्हा  त्याची काठी दादाने त्याला...जंगलाला परत दिली ....त्यान प्रवासासाठी आपल्याला मदत केली होती ...आता  परत दिली दुसरा कुणी जर त्याला काठी हवी असेल तर टी नवीन तोडणार नाही हीच वापरेल ......काहीतरी जुनी पुरचुंडी सोडल्य्सारखा झाल   खुपच माहिती जमा झाली जंगलान मला खूप शिकवलं ...काय टे माहित नाही ...पण मी त्याच्याशी बोलू शकतो खास मित्र सारख ..तो मला घाबरवत नाही ...माझ्या खास मित्रासारखी माझी काळजी घेतो .....एक विचार वेगळा सगळ्यांनाच मिळतो मला एक जाणीव मिळाली आहे ..........नंतर रात्री ७ वाजता पुण्यात पोचलो दुसऱ्यादिवशी काळाल कि हर्डीकर त्या भास्कर बरोबर पाचणे मार्गाने खाली उतरला ....काल  पासून आम्ही  गडावर फ्लोरोसंट बाण काढायचा प्रोजेक्ट हती घेतला  आहे ...१)दगडावर तारेच्या ब्रश ने बाण काढायचा २)तो साफ करायचा ३)त्याला पेंट करायचा   असा प्रोग्राम आहे त्याचे पैसे ,,लागणारी माणस ,,त्यांचे वेळ या सगळ्याच गणित हर्डीकर सांभाळणार .....मी फेसबुक वर त्याची माहिती द्यायची (फ्रेंड ऑफ ट्रेकर्स ) अस नाव ठेवलाय ..................आताच मला एक  फोन आला त्यात गोरक्ष गडला जायचं ....अवघड आहे म्हणतात ....शनिवारी सकाळी निघणार रविवारी रात्री परत ...

No comments:

Post a Comment